⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा – राज ठाकरे

नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा – राज ठाकरे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । नरेंद्र मोदी यांनी देशात आता सामान नागरी कायदा आणावा अशी मागणी राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत दिली. याचबरोबर देशातील लोकसंख्या नियंत्रण आणणारा कायदा करा अशी मागणी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांनि जे अकलेचे तारे तोडले त्यांना उत्तर देण्यासाठी मी सभा घेतली आहे असं राज ठाकरे म्हणाले. ईडीने नोटीस दिली म्हणून ट्रॅक बदलला हा गैरसमज. मला कोणतीही नोटीस येवो, अशा नोटिसींनी मी भीक घालत नाही.

यावेळी त्यांनी माझ्या ताफ्याला काही जण अडवणार आहेत हे गुप्तचर विभागाला समजलं, पण पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत हे समजलं नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे. आजची ही सभा मोठे स्क्रीन लावून अनेक राज्यांमध्ये दाखवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह