जळगाव लाईव्ह न्युज | 1 मार्च 2022 | रावेर तालुक्यातील खिरोदा शेत-शिवारातील वीज कंपनीचे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने केळी बागायती धोक्यात आली होती. या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी दखल वीज कंपनी अधिकार्यांना सूचना केल्या व शेतकर्यास ट्रान्सफार्मर मिळाल्याने केळी बागांचे होणार नुकसान टळले आहे.

अखेर शेतकर्यांना मिळाला न्याय
खिरोदा येथील फैजपूर रस्त्यावरील शेती शिवारातील शेतकर्यांची डीपी जळाल्यामुळे फरफट होत होती. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांकडे तक्रार करूनही त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकर्यांनी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे डीपी मिळण्याची मागणी केली. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने व 20 दिवस उलटल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेण्यात आली. दोन दिवसात साहित्याची पूर्तता करून डीपी, तारांसहित, वीज जोडणी करून देण्यात आल्याने मुक्ताईनगरात जावून खडसे यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी खिरोदा येथील शेतकरी उमेश चौधरी, रोझोदा येथील शेतकरी लिलाधर झांबरे, लखीचंद नेहेते, रुपेश हडपे, केतन इंगळे, हर्षल नेहेते, डॉ.विजय धांडे व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार असलेल्या शिरीष चौधरी यांच्या गावातील शेतकर्यांचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉ.विजय धांडे यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सोडवल्यानंतर या घटनेची तालुक्यात मोठी चर्चा राहिली.
हे देखील वाचा :
- नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकचे अनोखे आंदोलन
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ घातक तणनाशकावर अखेर बंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 1200 हून अधिक पदांसाठी भरती, पात्रता काय?
- ‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती
- डॉ. दिपकसिंह राजपूत यांच्याकडून संरक्षणमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार











