जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४४ कोटींची मागणी

ऑक्टोबर 17, 2021 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात दि.२८ व २९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बागायती व बहुवार्षिक फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी ३० लाख ६१ हजार रुपये इतके अनुदान शासनाकडे मागितले आहे.

farmer

जळगाव जिल्ह्यात २८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी होऊन जळगाव, बोदवड, एरंडोल, धरणगाव, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा व भडगाव तालुक्यातील ५३० गावांमधील तूर, मू्ग, उडीद, ज्वारी, सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी, मका, कांदा, केळी, भाजीपाला, पपई, लिंबू, सीताफळ या पिकांचे नुकसान झाले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५३० गावांमधील २ लाख ९५ हजार ५०६ हेक्टरवरील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे २ लाख ९१ हजार ८३२ शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी ३० लाख ६१ हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now