निष्काळजीपणा भोवला ! जळगाव एलसीबीचे चार जण निलंबित; नेमकं प्रकरण काय?

ऑक्टोबर 26, 2025 10:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२५ । अमळनेर व जामेनरहून गुरे चोरांना पकडून आणताना पोलिसांच्या ताब्यातून दोन संशयित आरोपी बेड्यांसह पळून गेले .या प्रकरणी कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Maharashtra Police Bharati 2022

यामध्ये पोहेकॉ. संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील आणि राहुल कोळी यांचा समावेश आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली.

काय आहे घटना?

अमळनेर व जामनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या चार जणांना अमळनेर येथे नेत असताना बुधवारी (२२ ऑक्टोबर) रात्री अमळनेरनजीकच्या अंडरपासजवळ वाहनाचा वेग कमी झाल्याने शाकीर शाह अरमान शाह (३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) व अमजद शेख फकीर कुरेशी (३५, रा. मेहरूण परिसर, जळगाव) हे दोघे जण बेड्यांसह पसार झाले होते. या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जळगाव शहरातून पकडण्यात आले होते. दोघे बेड्यांसह अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या प्रकरणी निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकारामुळे जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना केवळ निष्काळजीपणाची नाही तर एलसीबीच्या सुरक्षा व्यवस्थेला थेट धक्का आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now