पाल येथे चार दिवसात १४ हरणांचा मृत्यू

फेब्रुवारी 21, 2025 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पाल येथील हरिण पैदास केंद्रात चाऱ्यातून विषबाधा झाल्याने ६ ते ९ फेब्रुवारी या चार दिवसात १४ हरणांचा मृत्यू झाला. मृत हरणांमध्ये पचनशक्ती क्षीण व घटसर्पाचेही लक्षण आढळून आले होते.

haran

६ फेब्रुवारी रोजी हरणांचे शवविच्छेदन करून त्यांचा व्हिसेरा व खाऊ घातलेला चारा पाणी यांचे नमुने पुणे येथील शासकीय पशुरोग चिकित्सा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. दरम्यान, घटनेच्या तिसऱ्याच दिवशी दिवसभरात एका पाठोपाठ सहा तर चौथ्या दिवशी दोन हरणांचा अकस्मात मृत्यू झाला. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने वेळीच औषधोपचार केल्याने सात हरणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now