⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

रवंजे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । एरंडोल तालुक्यातील रवंजे बु, येथे २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी येथील पोलिसात उशिरा पर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.

सिकंदर उस्मान खान असे तरुणाचे नाव आहे. हा मूळ जळगाव येथील राहणारा होता, तो रवंजे बु! येथे त्याचे मामा बिस्मिल्ला गफुर मुसलमान यांच्याकडे राहून हातमजुरी करीत होता. मृत्यु करण्याचे नैराश्य, प्रेमप्रकरण, एकटेपणा या कारणास्तव या युवकाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास आहे.