जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । अवकाळी पावसाने खरिपात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी सुरु असल्याने याचा फटका रब्बी हंगामातही चांगलाच बसत असल्याचे चित्र चोपडा तालुक्यातील पारगाव येथे ७ रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात उभे असलेला मका, दादर व अन्य पिकांचे माेठे नुकसान झाले. गेल्या चार वर्षात अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना हैरान करुन सोडले आहे.
यात पारगाव, मितावली, धानोरा, कमळगाव, पुनगाव आदी शिवारात माेठ्या प्रमाणात नुकसात होत असते. दरम्यान, ७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे पारगाव शिवारातील उभा असलेला मका, दादर ही पिके आडवी झाली अाहे. यामुळे सुरेश किसन पाटील, भीमराव नामदेव पाटील, सुभाष रामदास पाटील, अशोक महारू पाटील, अरुण सुकलाल पाटील, उत्तम दशरथ पाटील, विजय रामराव पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
हे देखील वाचा :
- मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अस्थीरोग तज्ञ डॉक्टरने लढवली अशी शक्कल
- मसाकाने उसाचा मोबदला थकविला; उस उत्पादकांचा मतदानावर बहिष्कार
- केळीला भाव नाही, कर्ज फेडीची विवंचना.. निंभोराच्या तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
- इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च जास्त ; मंत्री गुलाबराव पाटीलांचा टोला
- शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद