जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून धरणगाव चौकातील उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. या उड्डाण पुलास राजमाता जिजाऊ उड्डाण पुल असे नाव द्यावे, अशी मागणी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्याकडे समस्त पाटील, मराठा समाज, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर नगरसेवक प्रा. मनोज पाटील, डॉ. सुरेश पाटील, दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंदे, रवींद्र पाटील, गजानन पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, शकुंतला अहिरराव, मनीषा पाटील, वर्षा शिंदे, स्वप्निल सावंत, प्रा. आर. एस. पाटील, के. डी. पाटील, अजय पाटील, राकेश पाटील, शेखर पाटील, हेमंत पाटील, शरद पाटील, समाधान पाटील, स्वप्निल बोरसे, योगेश पाटील, एम. के. मराठे, डी. एस. पाटील, नीलेश पाटील, दीपक बाविस्कर, कुंदन पाटील, एन. डी. पाटील, भाईदास पाटील, हेमंत पाटील, राज पाटील, नीरज शिंदे, गजानन पाटील, सचिन पाटील, आर. झेड. पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे देखील वाचा :
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ
- जळगावात चातुर्मास पर्वाला आजपासून प्रारंभ







