⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

खुशखबर! आता मिळणार स्वस्त वीज, केंद्र सरकारने लागू करणार नवा नियम

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । देशातील काही राज्यांमध्ये वीज दर प्रचंड महाग आहे. महाराष्ट्रात देखील वीज दर इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. यामुळे अनेक वीज ग्राहक महिन्याला येणाऱ्या वीज बिलमुळे हैराण झाले आहेत. जर तुम्हीही दर महिन्याला जास्त वीज बिल भरून हैराण असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आता सरकारने असे पाऊल उचलले आहे, ज्यानंतर तुमचे वीज बिल बऱ्यापैकी कमी होणार आहे. हो… तुला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. वीज दर निश्चित करण्यासाठी सरकार ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) नियम लागू करणार आहे. असे झाल्यास, देशभरातील वीज ग्राहक सौर तास (दिवसाच्या वेळेत) विजेच्या वापराचे व्यवस्थापन करून त्यांच्या वीज बिलात 20 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतील.

नेमका नियम काय?
सरकारने वीज टेरिफ प्रणालीत दोन मोठे बदल केले आहेत. ते टाइम ऑफ डे (टीओडी) टेरिफची सुरुवात आणि स्मार्ट मीटरिंग व्यवस्थेला तर्कसंगत बनवण्याशी निगडीत आहेत. सरकारच्या नवीन नियम TOD अंतर्गत, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी विजेचे वेगवेगळे दर लागू होतील.

म्हणजेच वीजदर चोवीस तास सारखा राहण्याऐवजी वेगवेगळ्या वेळी वेगळा-वेगळा राहील. यानुसार सौर तास (दिवसातील ८ तास) टेरिफ साधारण टेरिफपेक्षा १०% ते २०% कमी असेल, तर पीक अवर्समध्ये (व्यग्र काळ) टेरिफ १० ते २० % असेल. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे, ग्राहकांना गर्दीच्या वेळेत कपडे धुणे आणि स्वयंपाक करणे यांसारखी जास्त वीज वापरणारी कामे टाळता येतील.

अशा प्रकारे तुम्ही वीज बिल कमी करू शकता
नवीन प्रणाली अंतर्गत 1 एप्रिल 2024 पासून 10 kW आणि त्याहून अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी TOD शुल्क प्रणाली लागू होईल. हा नियम 1 एप्रिल 2025 पासून शेती वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी लागू होईल. तथापि, स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांसाठी, जेव्हा त्यांना असे मीटर बसवले जातील तेव्हाच TOD प्रणाली लागू होईल.

उर्जा मंत्रालयाने माहिती दिली
ऊर्जा मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने वीज (ग्राहक हक्क) नियम, 2020 मध्ये सुधारणा करून विद्यमान वीज दर प्रणालीमध्ये दोन बदल केले आहेत. हे बदल टाइम ऑफ डे (टीओडी) टॅरिफ प्रणालीचा परिचय आणि स्मार्ट मीटरशी संबंधित तरतुदींचे तर्कसंगतीकरण करण्याशी संबंधित आहेत.

वेळेनुसार विजेचे दर बदलतील
त्यानुसार, दिवसभरात एकाच दराने विजेसाठी शुल्क आकारण्याऐवजी, वापरकर्त्याने विजेसाठी भरलेली किंमत दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी बदलेल. निवेदनानुसार, नवीन दर प्रणाली अंतर्गत, सौर तासांमध्ये (राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित केलेले आठ तास) विजेचे दर सामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्के कमी असतील, तर ते 10 ते 20 टक्के असतील.