जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ७ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
हे देखील वाचा :
- या 5 राशींवर आज शनिदेवाची राहील कृपा ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात किती उमेदवार वैध-अवैध ठरले ; वाचा ही बातमी
- शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; ही आहेत शेवटची तारीख
- वाढत्या तापमानामुळे केळी बागा धोक्यात ; दरही कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात
- ऐनपूरच्या शेतकऱ्याला लावला २३ लाखांचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक