⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कोंबडी चोर… जाणून घ्या, नारायण राणे यांना कशी मिळाली ‘कोंबडी चोर’ची उपमा

जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपकडून केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे (Narayan Rane) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केल्याने पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी कोंबडी चोर (Kombdi Chor) म्हणून राणे यांचे फलक लावण्यात आले आहेत. नारायण राणे यांच्यावर अनेकवेळा कोंबडी चोर म्हणून टिका करण्यात आली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी राणे यांना कोंबडी चोर म्हणून हिणावत असतात. मुळात नारायण राणे यांना कोंबडी चोर का म्हटले जाते याबाबत प्रसिद्ध असलेले काही किस्से आम्ही आपल्या वाचकांसाठी देत आहोत.

काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांनी वांद्रे-पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केल्याचा आनंद त्यांच्या हातात ‘कोंबडी’ घेऊन साजरा केला. यासोबतच ‘कोंबडी चोर निवडणूक हरला…’ च्या घोषणाही लावल्या होत्या. आज पुन्हा राणे यांना शिवसैनिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असून ठिकठिकाणी भाजप कार्यालयात कोंबडी सोडून आंदोलन केले जात आहे.

‘कोंबडी चोर’चा प्रचलित किस्सा

मुंबई आणि कोकणातील काही जुने निष्ठावंत शिवसैनिक सांगतात कि, राणे यांना शिवसेनेत आणण्याचे काम पक्षाचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांनी केले आहे. ते सांगायचे की, राणे त्यांचे मित्र हनुमंत परब यांच्यासह त्यांच्या बालपणीच्या काळात चेंबूर परिसरात गुंडगिरी करत होते. लहानपणी त्याने आपल्या मित्रांसह चेंबूर परिसरात अनेक वेळा कोंबड्या चोरण्याचे काम केले होते. एकदा पकडले गेल्यावर त्यांना डाके यांनी वाचवले. मात्र, राणे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात अधिकृतपणे कोंबडी चोरीचा गुन्हा दाखल नाही. पण या किस्सामुळे नंतर त्यांना ‘कोंबडी चोर’ म्हणून चिडविण्यात येऊ लागले. शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून रामदास कदम आणि गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सर्वच शिवसेना नेते त्यांना कोंबडी चोर म्हणून टोमणा मारतात.

कोकणातील ‘कोंबडी चोर’चा किस्सा अधिकच खास

राणे यांना ‘कोंबडी चोर’ म्हणून चिडविण्यामागे आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. शिवसेना कार्यालय ‘शिवाल’ संबंधित आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राणे लहानपणी कोंबडी चोरण्याबरोबरच भांडणे आणि मारामारी करत होते. तो तरुण असताना त्याची टोळी चेंबूर परिसरात सक्रिय होती. या टोळीवर प्राणघातक हल्ल्यापासून ते खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राणे हे महाराष्ट्रातील कोकणातील असल्याने आणि कोकणात क्षुल्लक आणि मोठे गुन्हे करणाऱ्या गुंडांना ‘कोंबडी चोर’ म्हटले जाते, त्यामुळे राणे यांचे नावही ‘कोंबडी चोर’ असे पडले असे त्यांनी सांगितले.

दोनवेळा पराभव करीत शिवसेनेने उडवली होती खिल्ली

एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळा साहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राणे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेना सोडल्यापासून शिवसैनिकांनी राणे यांना ‘कोंबडी चोर’ म्हणत त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना त्यांचाच गड असलेल्या कोकणात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पोट निवडणुकीत देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दुसऱ्यांदा त्यांचा पराभव करून शिवसेनेने त्यांच्या राजकारणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता परंतु भाजपने त्यांचे पुनर्वसन करीत त्यांना थेट केंद्रीय मंत्रीपद बहाल केले.