जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । पारोळा एरंडोल विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून यातील काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. तर काही शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित असून ते तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांकडे केली आहे.

एरंडोल मतदार संघात सप्टेंबर, ऑक्टोबर २०२१ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले हाेते. असे असताना ही मतदार संघातील एरंडोल तालुक्यातील केवळ एकाच सर्कलला अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित तीन सर्कलला अनुदान अद्याप मंजूर झालेले नाही. तसेच पारोळा तालुक्यातील दोन सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आले हाेते.
परंतु तीन सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही. हे अनुदान देण्याची शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे उर्वरित सर्कलमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करून न्याय द्यावा, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य
- डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पर्यावरण दिनानिमित्त ३५१ रोपट्यांचे रोपण
- रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगबाबत सरकारची मोठी घोषणा ; ‘हा’ बदल होणार?
- GST चे चार स्लॅबवरून तीन होणार? 12% करसवलतीनंतर काय स्वस्त, काय महाग होईल?
- जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे आयोजन; नोंदणी कशी आणि कुठे कराल