---Advertisement---
बातम्या

देशातील दोन मंगळग्रह मंदिरांपैकी एक आहे जळगाव जिल्ह्यात; वाचा अमळनेरच्या मंगळग्रह मंदिराची इनसाईड स्टोरी

---Advertisement---

धरणी गर्भ संभूतं विद्युत्कान्ति समप्रभम् ।
कुमारम् शक्तिहस्तं च मंगलम् प्रणमाम्यहम् ॥
अर्थात पृथ्वीच्या पोटातून जन्मलेल्या, विजेप्रमाणे चमकणार्‍या, तेजस्वीपणे चमकणार्‍या, हातात शक्ती (शस्त्र) धारण करणार्‍या कुमार श्री मंगळाला प्रणाम

mangalgrah mandir story jpg webp webp

स्कंध पुराणातील आख्यायिकेनुसार, अंधकासुर नावाच्या राक्षसाला भगवान शिवाने वरदान दिले होते की त्याच्या रक्तातून शेकडो राक्षसांचा जन्म होईल. वरदानानंतर या राक्षसाने अवंतिकेत कहर केला. त्यानंतर गोरगरिबांनी शिवाची प्रार्थना केली. भक्तांचे संकट दूर करण्यासाठी शंभूने स्वतः अंधकासुराशी युद्ध केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. भगवान शिवाला घाम फुटू लागला. रुद्राच्या घामाच्या थेंबाच्या उष्णतेमुळे पृथ्वी फाटली आणि मंगळ ग्रहाचा जन्म झाला. या नव्याने जन्मलेल्या मंगळ ग्रहाने राक्षसाच्या शरीरातून निर्माण होणारे रक्ताचे थेंब शोषून घेतले. याच कारणामुळे मंगळाचा रंग लाल मानला जातो. तेव्हापासून मंगळाच्या देवतेला पृथ्वीपुत्र म्हटले जाऊ लागले. नवग्रहांची भारतात अनेक मंदिरे आहेत मात्र, फक्त मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात केवळ दोनच ठिकाणी आहेत. यापैकी एक मध्यप्रदेशातील उज्जैन येथे तर दुसरे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे. अमळनेरचे श्री मंगळग्रह मंदिर हे संपूर्ण भारतातील मंदिरांपैकी सर्वात प्राचीन मंदीरांपैकी एक मानले जाते.

---Advertisement---

मंगळ हा मूळ ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. ज्या मुला मुलीना मंगळ आहे अशा मुला मुलींना लग्नाकरिता अडचण निर्माण होते. यावर दोष निवारणार्थ काही उपायही धर्मशास्त्रात सुचविले आहेत. अशा व्यक्ती ज्यांच्या कुंडलीत मंगळ भारी असतो, ते आपल्या अशुभ ग्रहांच्या शांतीसाठी येथे उपासनेसाठी येतात. दर मंगळवारी मंदिरात भाविकांची वर्दळ असते. या मंदिरात ग्रहशांती मिळाल्याने ग्रह दोष संपतात अशी लोकांची श्रद्धा आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चौथ्या, सातव्या, आठव्या, बाराव्या घरात मंगळ असतो, ते श्रद्धेपोटी देशभरातील भाविक अमननेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येतात.

अमळनेर येथील मंगल देव ग्रह मंदिर कोणी बांधले आणि मूर्तीची स्थापना केव्हा झाली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काहींच्या मते १९३३ मध्ये पहिल्यांदा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. १९४० नंतर मंदिर पुन्हा एकदा विस्मृतीत गेले आणि जीर्णावस्थेत पोहोचले. १९९९ पर्यंत मंदिराचा परिसर शहरातील कचर्‍यासाठी डंपिंग ग्राउंड म्हणून वापरला जात होता. १९९९ नंतरच्या नूतनीकरणाने मंदिर आणि त्याच्या परिसरात चमत्कारिकरीत्या आनंददायी परिवर्तन घडवून आणले आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणाच्या आणि सुविधांचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. चोपडा गावाकडे जाणार्‍या मार्गावर हे मंगळग्रह मंदिर असून अमळनेर बसस्थानकापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर आहे.

मंदिराचे पावित्र्य जपत प्रेक्षणिय स्थळ म्हणून विकास

मंगळ ग्रह मंदिराचे धार्मिक पावित्र्य व महत्व जपत या ठिकाणाला एक प्रेक्षणिय आणि निसर्ग सौदर्याने परीपूर्ण स्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. या मंदिरात विराजमान शिस्तबध्द प्रवेश करण्यासाठी रांग लावणार्‍या भाविकांकरिता सुंदर शेड बांधण्यात आली आहे. बाराही महिने मन प्रसन्न करणारा तुळस बगिचा, बालकांना खेळण्यासाठी अनेक साधने असलेला व वनराईने नटलेला रोटरी गार्डन, मंगळ वनातील बंधार्‍यात साठलेले पाणी म्हणजे निसर्गाचा साक्षात आरसाच तुळसी बगीच्यातील प्रसन्नवदन भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर नितांत सुंदर कारंजा व रोषणाई नवकार कुटी व त्या खालील भगवान श्री शंकराची मूर्ती व जटातून बरसणार्‍या धारा व धबधबा असे मनोहरी दृष्य पहावयास मिळते. या मंदिरातच मंगळ देवांसोबत पंचमुखी हनुमान आणि भूमीमाता यांचा दर्शनाचा देखील लाभ घेता येतो. मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये वेगवेगळ्या आरत्या होतात. मंदिर प्रशासनातर्फे फक्त पंधरा रुपयात महाप्रसाद दिला जातो. यात कांदा व लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूर डाळ, भात, पुरी व गुळाचा शिरा दिला जातो. अमळनेर येथे दर मंगळवारी अभिषेक व मंगळ शांतीसाठी होम हवन होतात. येथे भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था आहे. येथे मंगळवारी महाप्रसाद असतो.

मंगळ दोषामुळे होवू शकते मोठे नुकसान

वैदिक पौराणिक कथेनुसार, मंगळ ग्रह शक्ती, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे आणि धर्माचा रक्षक मानला जातो. मंगल देव चार हातांनी त्रिशूळ आणि गदा धरलेले चित्रित आहे. मंगळ देवतेची उपासना केल्याने मंगळ ग्रहातून शांती मिळते आणि ऋण आणि संपत्तीपासून मुक्ती मिळते. कोरल/मुंगा मंगळाचे रत्न म्हणून परिधान केले जाते. मंगळ दोष ही अशी स्थिती आहे, की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जन्म झाला तर त्याला खूप विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागते, मंगल दोष हा कुंडलीतील कोणत्याही घरात स्थित असलेल्या अशुभ मंगळामुळे निर्माण झालेला दोष आहे. कुंडलीतील सामर्थ्य, मूळच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण करू शकते. मंगल दोष पूर्णपणे ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मचक्राच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असेल तर अशा स्थितीत जन्मलेल्या व्यक्तीला मांगलिक म्हणतात. लग्नासाठी ही स्थिती अत्यंत अशुभ मानली जाते. मांगलिक दोष हे नातेसंबंधात तणाव आणि विभक्त होणे, घरातील कोणतीही अप्रिय आणि अप्रिय घटना, कामात अनावश्यक अडथळा आणि गैरसोय आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान आणि जोडप्याच्या अकाली मृत्यूचे कारण मानले जाते. मुळात मंगळाच्या प्रकृतीनुसार असा ग्रहयोग हानिकारक प्रभाव दाखवतो, परंतु वैदिक उपासनेद्वारे त्याची तीव्रता नियंत्रित करू शकतो. मंगळ ग्रहाची उपासना केल्याने देवता मंगळ प्रसन्न होतो आणि मंगळामुळे निर्माण होणार्‍या विनाशकारी प्रभावांना शांत आणि नियंत्रित करून सकारात्मक प्रभाव वाढवता येतो. अशा व्यक्ती ज्यांच्या कुंडलीत मंगळ भारी असतो, ते आपल्या अशुभ ग्रहांच्या शांतीसाठी मंगळग्रह मंदिरात पूजेसाठी येतात.

मंगळग्रह मजबूत करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा हा आहे सल्ला

ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांपैकी एक, मंगळ हा सेनापतीचा दर्जा आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगल दोष असतो त्यांना जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील मंगळ दोषामुळे लोकांना अनेकदा लग्नात उशीर, वैवाहिक जीवनातील समस्या, वाद, कर्ज यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा मंगळ अशुभ असतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. मंगळाच्या वाईट स्थितीत व्यक्ती खूप क्रोधित होतो. काहींना बोलण्यातून राग येतो. याचे एक कारण मंगळाची अशुभता हे देखील असू शकते. आपल्या जीवनात ग्रहांचा मोठा प्रभाव असतो. ग्रह वाईट आणि चांगले दोन्ही असू शकतात. असे मानले जाते की ग्रहांच्या हालचालीमुळे जीवनात अनेक बदल घडतात. कधी सुख तर कधी दु:ख हे केवळ ग्रहांमुळेच.
हिंदू धर्मात मंगळ हा सर्व ग्रहांचा सेनापती मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ अशुभ असतो तेव्हा त्याचा केवळ तुमच्या जीवनावरच परिणाम होत नाही तर तुमच्या स्वभावावरही त्याचा तीव्र प्रभाव पडतो. मंगळ ग्रह बिघडत असताना व्यक्ती राग आणि चिडचिड होते. एवढेच नाही तर माणसाला चांगल्या वाईटातला फरकही कळत नाही. एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची दशा खराब असेल तर त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. मंगळ कमजोर असेल तर मंगळग्रह मंदिरात येवून दर्शन घ्यावे. यासह ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण केल्याने मंगळ बलवान होतो. मंगळवारी मंदिरात सिंदूर, चमेलीच्या तेलासह लाल वस्त्र, तांबे, गहू, गूळ यांचे दान करावे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---