गणरायासोबतच पावसाच्या आगमनाची शक्यता; जळगावमधील स्थिती जाणून घ्या..

ऑगस्ट 25, 2025 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२५ । गणरायाचे आगमन बुधवारी दि २७ ऑगस्ट रोजी होणार आहे आणि यासाठी राज्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. मात्र गणरायासोबतच राज्यात पावसाच्या आगमनाचीही शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे

Rain

राज्यात मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी पूर आले तर शेती पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता कुठे पावसापासून दिला मिळाला असतानाच आता परत एकदा पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. २६ ते २९ ऑगस्टदरम्यान राज्यातील बहुतांश भागात मध्यम पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत मध्यम पाऊस असेल. तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच मध्य प्रदेशमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now