जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । गेल्या दोन दिवसांपासून थंडी पुन्हा परतली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान मंगळवारी सकाळी ७ अंश नोंदविले गेले. थंडीचा कडाका आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

एरव्ही मकर संक्रांतीच्या सणानंतर दूर पळणारी थंडी गेल्या काही वर्षापासून संक्रांतीनंतरच वाढत आहे. नागरिक स्वेटर, उबदार टोपी कपाटात ठेऊन देण्याच्या तयारीत असतानाच ते पुन्हा बाहेर काढावे लागत आहे. गेल्या आठवड्यात थंडी परतेल असे वाटत असताना सोमवारपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. रविवारी तर पाकिस्तानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाने जळगावात धूळ निर्माण केली होती.
जळगावचा पारा अचानक कमी झाला असून किमान १५ अंश असलेले तापमान ७ अंशावर येऊन पोहोचले आहे. नागरिकांची हुडहुडी वाढली असून दिवसा देखील थंडी जाणवत आहे. पारा खाली आल्याने नागरिकांनी विशेषतः वृद्ध, अस्थमा रुग्ण, लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
- 3 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी लागू
- आनंदाची बातमी! जळगावमार्गे धावणार उधना-गया विशेष ट्रेन
- महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झोडपणार; 25 जिल्ह्यांना अलर्ट
- Gold Rate : आठवडाभरात सोने तीन हजारांनी घसरले, जळगाव सुवर्णनगरीतील आजचे नवीन दर तपासून
- जिल्हा वार्षिक पतयोजना 2025-26 चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न