⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | आरोग्य | नवं संकट..! H3N2 विषाणू झाला जीवघेणा, देशात रुग्णांसह मृत्यूची प्रकरणे वाढू लागली

नवं संकट..! H3N2 विषाणू झाला जीवघेणा, देशात रुग्णांसह मृत्यूची प्रकरणे वाढू लागली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२३ । कोरोना महामारीशी झुंज दिल्यानंतर आता देश H3N2 व्हायरसशी झुंज देत आहे. गेल्या काही आठवड्यांत, भारतात इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशाच्या राष्ट्रीय आणि आर्थिक राजधानीत फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात या विषाणूमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 52 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनालाही गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मास्क आणि इतर संरक्षणाकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.

नवी दिल्लीतील रुग्णालयांमध्ये H3N2 विषाणूच्या प्रकरणांमध्ये सुमारे 150 टक्क्यांनी वाढ होत आहे. या तेजीमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एका मृत्यूची बातमी समोर आली आहे. H3N2 विषाणूमुळे देशात आतापर्यंत तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

डॉक्टरांच्या मते, इन्फ्लूएंझा विषाणूमुळे ताप, थंडी वाजून येणे आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे उद्भवतात आणि काही प्रकरणांमध्ये सतत खोकला होतो. ज्यामुळे रुग्ण खूप अशक्त होऊ शकतात. भारतातील फ्लूच्या या वाढीमागे दोन इन्फ्लूएंझा ‘ए’ प्रकार आहेत. H3N2 हा फ्लूचा प्रबळ उपप्रकार म्हणून उदयास आला आहे, त्यानंतर H1N1 आहे.

वृत्तानुसार, कथित तिसरा मृत्यू 23 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याचा आहे. एका खासगी संस्थेतील एका विद्यार्थ्याला मित्रांसोबत बाहेर जाताना विषाणूची लागण झाल्याचे बोलले जात आहे. पोस्टमॉर्टममध्ये त्याच्या रक्तात H3N2 विषाणूचे अंश आढळून आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.