जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जातेय; पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

मार्च 4, 2021 9:59 PM

 

gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृहातील अत्याचारप्रकरणाचा मुद्दा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलच गाजत आहे. विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. दरम्यान, वसतिगृहात कुठलाही गैरप्रकार घडलेला नसून असल्यामुळे या माध्यमातून जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सभागृहात म्हणाले आहे.

 

जळगाव शहरातील महिला वसतीगृहात झालेला प्रकाराची वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यात बातम्या आल्या. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. परंतू असा प्रकार झालेला नसून आमचा मतदार संघ असलेला जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचेही ना.पाटील म्हणाले आहे.

Advertisements

 

या प्रकरणी गृहमंत्र्यांनी उच्च अधिकार्‍यांच्या समितीद्वारे चौकशी केली असता हे प्रकरण घडलेच नसल्याचे समोर आले. या प्रकरणी ज्या महिलेने आरोप केले तिच्या विरूध्द १७ वेळेस तक्रारी करण्यात आल्या आहेत. ती मनोरूग्ण असल्याचे आधीच समोर आले असून तिने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now