---Advertisement---
जळगाव जिल्हा प्रशासन

पुलाच्या रखडलेल्या कामासाठी साेमवारी उपोषण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । येथील आसोदा रेल्वगेट ते यावल या राज्यमार्गावरील आसोद्यातील रखडलेल्या पुलाच्या कामास तात्काळ सुरुवात करून निश्चित आराखड्यानुसार काम पूर्ण करण्यात यावे अशा मागणीसाठी आसोदेकेर ग्रामस्थ सोमवार दि १८ रोजी गावातील राज्यमार्गावरील पुलावरच साखळी उपोषणाला बसणार आहेत.

१२३ jpg webp

पुलाची रूंदी ही निश्चित आराखड्यानुसार न घेतल्याने या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने महिन्याभरापासून हे काम बंद केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विभागाकडे वारंवार तक्रार करूनही काम सुरु करण्यात येत नाही, यासह आराखड्याची माहितीही दिली जात नाही. पुलाचे काम ५० टक्यांपेक्षा अधिक झाले आहे. दीड महिन्यापासून कंत्राटदाराने काम बंद केले आहे. परिणामी हजारो वाहनधारकांना गैरसोयीच्या मार्गाने जावे लागत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---