प्रवाशांना दिलासा! भुसावळहुन धावणाऱ्या ‘या’ विशेष ट्रेनच्या कालावधी वाढ

मार्च 2, 2024 4:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२४ । खान्देशातील प्रवाशांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गदर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ मुंबई सेंट्रल विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे. ही गाडी जळगावसह अमळनेर नंदुरबार मार्गे मुंबई सेंट्रल जात असल्याने खान्देशातील प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

train 3 jpg webp

भुसावळ येथून सुटणारी गाडी (०९०५२) भुसावळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही दि. २८ फेब्रुवारीपर्यंत होती, ही गाडी आता १ मे पर्यंत चालवली जाणार आहे. तर गाडी (०१०५१) मुंबई सेंट्रल- भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही २७ फेब्रुवारीपर्यंत होती. आता ही गाडी ३० एप्रिलपर्यंत धावणार आहे.

Advertisements

दरम्यान, भारतीय रेल्वेने पॅसेंजर रेल्वेंच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. या निर्णयानंतर भुसावळहुन धावणाऱ्या गाडी क्रमांक ०९०७७-७८ भुसावळ-नंदुरबार गाडीच्या तिकीट दरात कपात करण्यात आलीय. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now