जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसापूर्वी कापसाच्या दरात वाढ दिसून आली. मात्र ‘सीसीआय’ने चालू हंगामातील गाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी काढल्यामुळे खासगी बाजारात मध्यंतरी वधारलेले कापसाचे दर आता काही प्रमाणात खाली आले आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातील कापसाचे दर ७,६०० ते ७,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, सीसीआयने आपल्याकडील मालाची आता विक्री सुरू करताच हे दर आता खाली आले आहेत. सध्या सरासरी दर ७,४०० ते ७,५०० दर मिळत आहे.

शेतकऱ्यांकडे अजूनही काही प्रमाणात कापूस शिल्लक आहे. भाव पुन्हा ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी काढलेला नाही. मात्र, दुसरीकडे सीसीआयचा माल बाजारात आल्याने आगामी काळात कॉटन बाजार नेमका कोणत्या दिशेला जाईल, याबाबत तज्ज्ञांमध्येही संभ्रम कायम आहे.







