⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

2047 पर्यंत प्रत्येक नागरिक वार्षिक 10 लाख रुपये कमविणार ; काय आहे NITI आयोगाचे नियोजन? जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । भारताची अर्थव्यवस्था आज झपाट्याने वाढत असून लवकरच हा देश विकसित देशांच्या यादीत येऊ शकतो. भारत लवकरच अर्थव्यवस्थेबाबत जगात झेंडा फडकवू शकतो. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन रुपयांची होईल, तो काळ दूर नाही. NITI आयोगानुसार, भारत 2047 पर्यंत 30 ट्रिलियन रुपयांच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल अशी अपेक्षा आहे. सध्या, भारत 3.7 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

2030 पर्यंत, जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. S&P रेटिंग एजन्सीनुसार, भारताचा नाममात्र GDP 7.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. त्याच वेळी, NITI आयोगाने 2047 पर्यंत भारताला सुमारे 30 ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे.

NITI आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी अलीकडेच सांगितले की, 2047 पर्यंत भारताला सुमारे 30 ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. 2047 चा व्हिजन इंडियाचा मसुदा डिसेंबर 2023 पर्यंत तयार होईल. येत्या तीन महिन्यांत ते सादर होणार आहे.

जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा भारत 2047 मध्ये 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठेल, तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12,000 डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये असेल. उच्च उत्पन्न देणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची व्याख्या करण्यात आली. NITI आयोगाच्या प्रारंभिक अंदाजानुसार, जर भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवायचे असेल, तर 2030 ते 2047 या काळात अर्थव्यवस्थेला वार्षिक 9 टक्के वेगाने वाढ करावी लागेल. सध्या मोदी सरकार अर्थव्यवस्थेबाबत वेगाने काम करत आहे. परदेशी गुंतवणूक देशात यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. G-20 परिषदेत मोदी सरकारने परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे भव्य स्वागत केले होते. या यशस्वी कार्यक्रमाची जगभरात चर्चा आहे.