जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव येथील महसूल विभागाने गेल्या काही महिन्यापासून पीएम किसान योजनेच्या कामाला अचानक ब्रेक लावले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे अक्षरश: हाल झाले आहे. दररोज तालुक्यातील हजारो शेतकरी तक्रारची समस्या घेऊन महसूल विभागात येतात. परंतु हे काम आमचे नसून कृषी विभागाचे आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे.
आतातरी आमच्या समस्या कोणीतरी सोडवाव्या यासाठी शेतकरी दररोज फेरफटका मारत असतो. या गंभीर समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अगोदरच कोरोनाची झळ अध्यापपर्यंत सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यात प्रधानमंत्री किसान संम्मान योजनेच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक सहाय्य तांत्रिक अडचणीमुळे बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.