⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गरजू विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान

गरजू विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । लॉकडाउनचा काळ हा सर्वांसाठीच अडचणीचा ठरला आहे. सगळ्याच क्षेत्रांमध्ये याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. परंतु शिक्षण क्षेत्रात झालेला बदल प्रत्येक विध्यार्थ्यांच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घेऊन आला आहे .शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत ऑनलाइन शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वत्र वाहू लागली. परंतु लॉक डाऊन च्या काळात आर्थिक अडचणीमुळे मोबाईल व इतर सुविधांच्या अभावी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना बऱ्याच आव्हानाना सामोरे जावे लागत आहे.

काही विद्यार्थ्याच्या पालकांनी  गुरे विकून,कर्ज घेऊन तर आईने मंगळसूत्र मोडून मोबाईल घेतले आहे असे काही विद्यार्थ्यांनी दीपस्तंभ मिशन शिबिरात निःशुल्क प्रशिक्षणासाठीच्या अर्जात नमूद केले आहे.या वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे  शिक्षण अक्षय्य राहावे म्हणून अक्षय तृतीयेपासून  दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे रतनलाल सी. बाफना ट्रस्ट जळगाव, हाय मिडिया लेब्रोटरी ठाणे व पुखराज पगारिया फाउंडेशन जळगाव यांच्या सहकार्यातून 10वी व 12 वीच्या गुणवंत व गरजू  विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. अशी माहिती दीपस्तंभ फाउंडेशन चे उपाध्यक्ष डॉ राजेश डाबी यांनी दिली

या अभियानाअंतर्गत आर्थिक परिस्थिती अत्यंत अडचणी ची असलेले गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग व अनाथ विद्यार्थी यांचे शिक्षण घेता यावे यासाठी  अँड्रॉइड मोबाईल,परिक्षा फॉर्म फीस/ट्यूशनस फीस् साठी आर्थिक सहाय्य, पुस्तके या बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गरजू विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या शिक्षकांनी अर्ज करताना स्वतः ची संपूर्ण माहिती,मिळवलेले यश / विशेष प्राविण्य,कौटुंबिक माहिती,आर्थिक परिस्थिती,कोणती मदत हवी आहे, शिफारस देणाऱ्या शिक्षकांचे नाव व संपर्क असे सविस्तरपणे अर्जात नमूद करून या 8380076545 क्रमांकावर व्हॉटसअप मेसेज करावा.

आलेल्या अर्जांपैकी पडताळणीनंतर गुणवत्तेच्या आधारे व आर्थिक परिस्थितीनुसार 200 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संपर्क केला जाईल.कुठलाही घटक शिक्षणाच्या प्रवाहातून वंचित राहू नये हाच या उप्रकामा मागील उद्देश्य आहे. काळ बिकट असला तरी  शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे.शिक्षणच व्यक्तीला नंतर कधीच हात पसरवण्याची वेळ येऊ देत नाही व ती व्यक्ती इतरांनाही उभारण्यासाठी सहकार्य करू शकते.नागरिकांनाही या योजनेत सहभागी व्हावे.ज्या व्यक्तींना/संस्थांना  या अभियानात आर्थिक योगदान व मोबाइल देऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करायचे असल्यास देणगीसाठी संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन संस्थे मार्फत करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.