जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । अवकाळी पावसाने खरिपात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी सुरु असल्याने याचा फटका रब्बी हंगामातही चांगलाच बसत असल्याचे चित्र चोपडा तालुक्यातील पारगाव येथे ७ रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात उभे असलेला मका, दादर व अन्य पिकांचे माेठे नुकसान झाले. गेल्या चार वर्षात अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना हैरान करुन सोडले आहे.
यात पारगाव, मितावली, धानोरा, कमळगाव, पुनगाव आदी शिवारात माेठ्या प्रमाणात नुकसात होत असते. दरम्यान, ७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे पारगाव शिवारातील उभा असलेला मका, दादर ही पिके आडवी झाली अाहे. यामुळे सुरेश किसन पाटील, भीमराव नामदेव पाटील, सुभाष रामदास पाटील, अशोक महारू पाटील, अरुण सुकलाल पाटील, उत्तम दशरथ पाटील, विजय रामराव पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांनो काळजी घ्या! 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार, IMD चा अंदाज
- जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी
- ऑनलाईन पेक्षा स्वस्त आयफोन जळगावात; iPhone 13 मिळवा फक्त ४० हजार रुपयात
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस उत्साहात संपन्न
- प्रवाशांना दिलासा ! ओखा-मदुरै एक्स्प्रेस २८ जूनपर्यंत धावणार ; भुसावळ, जळगावला आहेत थांबा