जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । अवकाळी पावसाने खरिपात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी सुरु असल्याने याचा फटका रब्बी हंगामातही चांगलाच बसत असल्याचे चित्र चोपडा तालुक्यातील पारगाव येथे ७ रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात उभे असलेला मका, दादर व अन्य पिकांचे माेठे नुकसान झाले. गेल्या चार वर्षात अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना हैरान करुन सोडले आहे.

यात पारगाव, मितावली, धानोरा, कमळगाव, पुनगाव आदी शिवारात माेठ्या प्रमाणात नुकसात होत असते. दरम्यान, ७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे पारगाव शिवारातील उभा असलेला मका, दादर ही पिके आडवी झाली अाहे. यामुळे सुरेश किसन पाटील, भीमराव नामदेव पाटील, सुभाष रामदास पाटील, अशोक महारू पाटील, अरुण सुकलाल पाटील, उत्तम दशरथ पाटील, विजय रामराव पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हे देखील वाचा :
- आसोदा उड्डाणपूल प्रकरणाची नितीन गडकरींकडून गंभीर दखल; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
- जळगावातील युवकांसाठी खुशखबर ; नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
- पंढरपूर वारी ठरली एसटीसाठी लाभदायी ! आषाढी वारीत जळगाव विभागावच्या तिजोरीत ‘इतक्या’ कोटींची कमाई!
- जळगाव पालिकेच्या पार्किंगमधून गाडी लांबविणारा सराईत जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त







