⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | वाणिज्य | गृहिंणीसाठी खुशखबर…ऑक्टोबरपासून खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी? केंद्राने उचलले ‘हे’ पाऊल

गृहिंणीसाठी खुशखबर…ऑक्टोबरपासून खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी? केंद्राने उचलले ‘हे’ पाऊल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । मागील काही महिन्यात खाद्य तेलांच्या किंमती गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमोडून गेले आहे. दरम्यान, आता सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्राहक मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवत व्यापाऱ्यांना दर आठवड्याला आपला स्टॉक जाहीर करण्यास सांगितले आहे.

तसेच सरकारनं आयात शुल्क तब्बल ५.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या एक वर्षात खाद्यतेलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे आणि काही तेलांच्या बाबतीत किमतीत 50 ते 70 टक्के वाढ झाली आहे. सरकारने किंमती नियंत्रित करण्यासाठी आयात वाढवण्यासाठी विविध पावले उचलली आहेत.

केंद्र सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावरील (Crude Palm Oil- CPO)आयात शुल्क ३०. २५ टक्क्यांवरुन २४.७ टक्के इतकं केलं आहे. तर रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरुन ३५.७५ टक्क्यांवर आणलं आहे. रिफाइंड सोया तेल आणि सनफ्लावर तेलावरील आयात शुल्क देखील ३० सप्टेंबरपर्यंत ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के इतकं करण्यात आलं आहे.

सरकार पोर्टल आणेल
डाळींप्रमाणेच सरकार लवकरच खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा सार्वजनिक करण्यासाठी एक पोर्टल आणणार आहे. जे पुढील आठवड्यात कार्यान्वित होईल. व्यापारी आणि उद्योग याद्वारे त्यांच्या स्टॉकचा खुलासा देऊ शकतात, ज्याचे निरीक्षण राज्य सरकार करेल.

साठेबाजीवर सरकार करणार कडक कारवाई 
सरकारचे म्हणणे आहे की खाद्यतेलांच्या आयातीवरील सीमाशुल्क कमी करूनही किमती कमी होत नाहीत आणि त्याचे एक कारण साठेबाजी असू शकते. त्यामुळे साठेबाजीला आळा घालण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या (ईसीए) अंतर्गत व्यापारी, व्यापारी, प्रक्रिया युनिट्सना त्यांच्या स्टॉकची माहिती सरकारला द्यावी लागेल. राज्य सरकार हे काम करतील आणि त्यांना आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत हा अधिकार देण्यात आला आहे.

परिस्थिती देखील अनुकूल होत आहे
सरकारने सांगितले की, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाऊस असूनही सोयाबीनचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे. राज्यांवर विश्वास ठेवायचा झाला तर हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा चांगले होईल. यासह, आंतरराष्ट्रीय बाजारात पाम आणि सोयाबीन तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत, ज्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या किमती खाली येतील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.