⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | उच्च दाब विद्युत वाहिनी तुटली, ३५ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

उच्च दाब विद्युत वाहिनी तुटली, ३५ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे उच्च दाबाची तार अचानक पडल्याने ३५ बकर्‍यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. 

नांद्रा येथील रवींद्र देशमुख यांच्या शेतामध्ये राजाराम सखाराम भिल्ल (रा. बांबरूड राणीचे, ता. पाचोरा) यांनी त्यांच्या मालकीच्या बकर्‍या बसविल्या होती. येथे बकर्‍यांसाठी तारांचे कंपाऊंड तयार करण्यात आलेले आहे. याच्याच वरून हाय टेन्शन अर्थात उच्च दाबाच्या तारा गेलेल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास वरून गेलेल्या उच्च दाबांच्या तारा खालील तारांवर पडल्या. यामुळे त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह उतरून ३५ बकर्‍यांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे बकर्‍यांवर उदरनिर्वाह करणार्‍या राजाराम भिल्ल यांची मोठी हानी झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.