---Advertisement---
जळगाव शहर

सत्ताधारी मंत्र्यांनी जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी थांबावे : डॉ.सतिष पाटील

satish patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । जळगावसह राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. मात्र त्याकरीता लॉकडाऊन करून चालणार नाही. तर राज्यातील सत्‍ताधारी मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दोन दिवस मुक्‍कामी राहून प्रशासन गतिमान केल्यास परिस्‍थिती आटोक्यात येईल; असे म्‍हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी घरचा आहेर दिला आहे.

satish patil

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाबत त्यांनी माजी पालकमंत्री म्हणून चिंता व्यक्त केली. सध्या शासन करत असलेल्या उपाय योजनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी पक्ष या गंभीर स्थितीत काम न करता टीका करीत आहे, हे बरोबर नाही. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

---Advertisement---

राज्यातील सत्ताधारी मंत्र्याबाबत ते म्हणाले, की पक्ष बांधणीसाठी या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन- तीन दिवस मुक्काम केला. परंतु कोरोनाची साथ वाढत असताना याच मंत्रांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन करण्याचे सुचविले जात आहे. मात्र हा उपाय होऊ शकत नाही. सरकारने प्रशासन गतिमान करण्यासाठी मंत्र्यांना प्रत्‍येक जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाठवून त्याठिकाणी तालुकानिहाय बैठका घेऊन आरोग्याचा आढवा घ्यावा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---