⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | 14 ते 22 जुलैपर्यंत भुसावळमार्गे धावणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द

14 ते 22 जुलैपर्यंत भुसावळमार्गे धावणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । भुसावळमार्गे तुम्हीही इटारसीकडे रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत भुसावळ-खंडवा विभागातील गेज रूपांतरण आणि खंडवा यार्ड सेमॉडेलिंगशी जोडल्याने प्री-एनआय आणि एनआय काम केले जात आहे. या कामाचा परिणाम म्हणून काही प्रवासी गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार आहे. भुसावळ मार्गे धावणाऱ्या इटारसी, कटणीसह १२ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या रद्द:
यात भुसावळ येथून १४ ते २२ जुलै दरम्यान सुटणारी ११११५ भुसावळ-इटारसी व ११११६ इटारसी-भुसावळ एक्स्प्रेस रद्द राहील. १९०१३ भुसावळ-कटनी ही गाडी धावणार नाही. १५ ते २३ जुलैपर्यंत १९०१४ कटनी-भुसावळ एक्सप्रेस, १४ ते २१ जुलैपर्यंत ०२१८५ रिवा-सीएसएमटी एक्सप्रेस, १५ आणि २२ जुलै रोजी ०२१८६ सीएसएमटी-रिवा, १४ आणि २१ जुलै रोजी ०२१३२ जबलपूर-पुणे, १५ आणि २२ जुलै रोजी ०२१३१ पुणे-जबलपूर १५, १७ आणि २० जुलै रोजी १२१८८ सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ, २० जुलै रोजी २२१७२ कमलापती-पुणे एक्सप्रेस तसेच २१ जुलै रोजी २२१७१ पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस रद्द असेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.