जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. आणि जिल्ह्यातील यावल, रावेर चोपडासह इतर भागात मोठ्या प्रमाणात केळी उत्पन्न घेतलं जाते. लाखो रुपयांचा खर्च लावून शेतकरी केळी पीक पिकवीत आहे. मात्र यातच अज्ञातांकडून खोडे कापून फेकल्या जात असल्याच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना सावद्यातील चिनावल येथे घडली.

चिनावल येथे जुना सावदा रस्त्यालगत असलेल्या शेतात अज्ञात व्यक्तींनी केळीची सुमारे ३५०० खोडे कापून टाकल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतात मेहनतीने उभी केलेली केळीची लागवड एका रात्रीत उद्ध्वस्त करण्यात केल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत असे की, खेमा कामा पाटील यांची चिनावल परिसरात शेती असून त्यांनी केळीची लागवड केली. मोठ्या कष्टाने त्यांनी केळीची बाग फुलवली. मात्र अज्ञातांनी खेमा पाटील यांच्या शेतातील ३५०० खोडे कापून फेकली. या घटनेमुळे खेम पाटील यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकार कोणाच्या हातून घडला याबाबत अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात सावदा पोलीस माहिती कळताच पोलिसांनी शेताकडे धाव घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहे.









