जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत कळविले आहे.
शासनाच्या आदेशानुसार मनाई आदेश लागू केलेल्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
हे देखील वाचा :
- उज्ज्वल निकमांच्या उमेदवारीवर पुतणे रोहित निकमांची प्रतिक्रिया ; म्हणाले मी लोकसभा..
- खुशखबर! तीन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या धावणार ; भुसावळ, जळगाव येथे असेल थांबा
- जळगाव आणखी तापणार! उद्यापासून तापमान वाढीचे संकेत, ‘या’ तारखेपासून पावसाची शक्यता
- महिला डॉक्टरसोबत रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल
- शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात तीन सभा होणार ; कुठे आणि कधी??