टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदकाचे खाते उघडले

जुलै 24, 2021 1:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदकाचे खाते उघडले आहे. देशाला पहिले पदक एका महिलेने जिंकून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून दिले. 

tokyo olympic jpg webp

मीराबाईने एकूण २०२ किलो वजन उचलले. या प्रकारात चीनच्या होउ झीहुईने सुवर्णपदक जिंकले. तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कास्यपदक जिंकले. 

मीराबाईला गेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश आले होते. त्यानंतर तिच्यावर टीका देखील झाली होती. पण गेल्या चार वर्षात मीराबाईने कठोर मेहनत घेतली आणि त्याचे यश आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now