⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जनता कर्फ्यू : १५ मार्चपर्यंत विद्यापीठ बंद राहणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहरात ११ मार्च रोजी रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ८ पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर केल्यामुळे या कालावधीत विद्यापीठ बंद राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जळगाव शहर महानगर पालिका हद्दीतील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठ १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील.

अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून

दरम्यान, जनता कर्फ्युच्या काळात पुर्व नियोजित परीक्षांचे ऑनलाईन, आफॅलाईन कामकाजाची कार्यवाही सुरू राहील. संबंधीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत परीक्षेच्या कामासाठी उपस्थित रहावे असेही आवाहन प्रभारी कुलसचिव प्रा. बी.  व्ही. पवार यांनी परीपात्राद्वारे केले आहे.